अन्य

कांग्रेस नेता संदीप तंवर ने लिहीले रक्ताने पत्र

राहुल गांधी यांना कांग्रेसचा अध्यक्ष करण्याची मागणी

नवी दिल्ली/२४-: काँग्रेस (Congress) नेता संदीप तंवर (Sandeep Tavar) यांनी आपल्या रक्ताने पत्र लिहून राहुल गांधी यांना काँग्रेसचा अध्यक्ष करा, अशी मागणी केली आहे. ते म्हणाले की, जर राहुल गांधी (Rahul Gandhi) जर अध्यक्ष झाले नाहीत तर हा निर्णय पक्षाच्या विरोधात होईल.संदीर तंवर यांने पत्रात लिहिले आहे की, राहुल गांधी यांनी पक्षासाठी खूप कष्ट घेतले आहेत. वाईट परिस्थितीत देशातील लोकांसाठी आवाज उठवला आहे. जर राहुल गांधी अध्यक्ष झाले नाही, तर निर्णय पक्षाच्या हिताचा नसेल. दिल्ली प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अनिल चौधरी यांनी रविवारी सांगितले की, पार्टीचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनाच पक्षाचा अध्यक्ष व्हायचं नाही. इतकचं नाही तर दिल्ली काँग्रेसने राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष होण्यासाठी एक प्रस्ताव पार केला आहे. ज्यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व प्रदाश करण्यासाठी राहुल गांधी यांना अखिल भारतीय काँग्रेस समितीचा अध्यक्ष बनविण्याची मागणी केली आहे.

letter-amravati-mandal

Related Articles

Back to top button