मराठी

राज्यात कोरोनाचे 19,164 रुग्ण वाढले,

तर 459 रुग्णांचा मृत्यू

मुंबई/दि.२४ – राज्यात आज कोरोनाचे 19,164 रुग्ण वाढले आहेत. तर गेल्या 24 तासात 17,184 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 459 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण कोरोना संक्रमितांची संख्या 12,82,963 वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत 9,73,214 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून अजूनही राज्यात 2,74,993 रुग्ण उपचार घेत आहेत.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 75.86 त्न टक्के इतका झाला आहे. तर मृत्यूदर 2.68 टक्के इतका आहे.
आतापर्यंत राज्यात 61,90,389 जणांची कोरोना टेस्ट झाली असून 12,82,963 जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
सध्या राज्यात 18,83,912 जण होम क्वारंटाईन असून 33,412 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

Related Articles

Back to top button