मराठी

दिर्घ रजेनंतर महापालिकेचे मुख्यलेखापाल पुर्ववत कामावर रूजू

अमरावती प्रतिनिधी/ ९ ऑगस्ट – गेल्या काही दिवसांपासून दिर्घ रजेवर असलेले महानगर पालिकेचे मुख्यलेखापालन प्रमोदास राठोड हे नुकतेच आपल्या सेवेवर रूजु झाले आहे. त्यामुळे मनपाच्या आर्थिक बाबींची रखडलेली प्रकरणे लवकरच निकाली लागण्याची श्नयता आहे. अमरावती मनपा मुख्यलेखापाल प्रेमदास राठोड हे गेल्या काहीदिवसापासून दिर्घ रजेवर गेले होते. त्यामुळे मनपाच्या लेखा विभागातील कामकाजहे जवळपास ठप्प झालेले होते.मुख्यलेखाधिकारी रजेवर असल्याने अनेक विकास कामांच्या निधीचे प्रकरणे कंत्राटदारांची देयके, कर्मचाèयांच्या थकबाकीचा प्रश्न आदि बाबी रखडल्या होत्या. मात्र नुकतेच मुख्यलेखापाल प्रेमदास राठोड हे आपल्यासेवेत पुर्ववत रूजु झाले आहे. त्यामुळे मनपाच्या लेखाविभागातील अनेक रखडलेल्या फाईली व मंजुरातीची प्रकरणे निकाली निघण्याची श्नयता वर्तवण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button