मराठी

गलवानमधील माघार भारताच्या पथ्यावर

नवी दिल्ली/दि. २० – भारत-चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून दोन्ही देशांच्या सैनिकांनी माघारी जाण्याचा निर्णय झाला. ज्या भागातून हेसैनिक परतले, तिथेभारतीय सैन्याला पुन्हा पोचण्यास तीन तास तर चीनच्या सैन्याला 12 तास लागणार आहेत. त्यामुळेही माघार भारताच्या पथ्थ्यावर पडली आहे.
भारताचेमाजी लष्करप्रमुख जनरल व्ही.पी. मलिक यांनी सांगितल्याप्रमाणे, लडाखमध्येऑपरेशन स्नो लेपर्डचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण किनार्‍यांवरून भारत-चीनचेसैनिकमाघारी गेल्याचा दुजोरा मिळाला. हाच टप्पा सर्वात महत्वाचा होता. कारण, हे तेच पॉइंट्स आहेत ज्या ठिकाणी दोन्ही देशांचे सैनिक समोरासमोर आले होते. अशी परिस्थिती कधीही युद्धात बदलली असती. म्हणजेच या निमित्तानेयुद्धाची परिस्थिती टळली. भारतासाठी ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहेकी चिनी सैनिकांना आपण ठरवून दिलेल्या अटींवर परत पाठवले आहे.
कैलाश रेंजवरून परत येण्याचा अर्थअसा मुळीच नाही की आपण त्या ठिकाणी पुन्हा जाऊ शकत नाही. चीनने काही कुरापत केल्यास भारताचेसैनिक त्या ठिकाणी अवघ्या तीन तासांत पुन्हा पोहोचू शकतील; पण चीनच्या सैनिकांना त्याच ठिकाणी पुन्हा पोहोचण्यासाठी 12 तास लागतील. चीनला मागेलोटण्यात यशस्वी होऊन आपण पहिल्यांदाच 1962 च्या पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर आलोआहोत. चीननेआपल्या लेखी अटी मान्य करून माघार घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. चीनने चिलखती वाहने, तोफखानेआणि टँक हटवल्या आहेत. मग, दोन्ही देशांचे सैनिक उत्तर आणि दक्षिण किनार्‍यांवरून मागेसरकले. आपले सैनिक कैलाश रेंजवरून मागे आले. आता पुन्हा दोन्ही लष्करांचे प्रतिनिधी बैठका घेतील. यामध्येदेपसांग, गोगरा आणि हॉट स्प्रिंगवरील पॅट्रोलिंग पॉइंट्सवर चर्चाहोणार आहे.
गेल्या दहा महिन्यांत आपण चीनला हेदाखवून दिलेकी तडजोड केल्याशिवाय पर्याय नाही. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सामान्य परिस्थिती खराब करण्याचा कट कुचकामी ठरला आहे. कैलाश रेंजवरून आपण मागेहटल्यानेचीन काही कुरापती करणार अशीही शक्यता वर्तवली जात आहे, तरीही मी खात्रीनेम्हणूशकतोकी दक्षिण पँगाँगमध्येआपली परिस्थिती मजबूत आहे.

Related Articles

Back to top button