मराठी

भाजपचे महाराजांबद्दलचे प्रेम हे फक्त मतांपुरतचे आहे – जयंत पाटील

कर्नाटक राज्यात छत्रपतींचा पुतळा रातोरात हटवल्याच्या मुद्दयावरून राष्ट्रवादीने केला तीव्र निषेध...

मुंबई दि.८  – भाजपचे छ्त्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम फक्त मतांपुरते आहे हे कर्नाटक राज्यात छत्रपतींचा पुतळा रातोरात हटवून सिध्द झाले असून या घटनेचा तीव्र निषेध राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.
भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवण्यात आला आहे या घटनेबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक झाली असून भाजपच्या बेगडी प्रेमावर कडाडून टिका केली आहे.
छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खासदार पदाची शपथ घेतली, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष त्यांनी केला तेव्हा काय घडले हे आपल्याला माहिती आहे. भाजपच्या मनात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत द्वेष का आहे ? असा संतप्त सवालही जयंत पाटील यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button