मराठी

सुशांत आत्महत्येप्रकरणी भाजपचे राजकारण

आ. रोहित पवार यांचा आरोप; तपासासाठी मुंबई पोलिस सक्षम

प्रतिनिधी/दि.३
पुणेः अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर भाजपने महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित करत याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यावर सुशांत आत्महत्या प्रकरणात भाजप राजकारण करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. बिहारमध्ये येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा वेगळ्या अर्थाने पेटवला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
पवार म्हणाले, की महाराष्ट्र सरकार कुणालाही घाबरत नाही. शासकीय व्यक्ती महाराष्ट्रात येते. त्या ठिकाणी राजशिष्टाचार पाळला जावा; मात्र सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाच्या खोलात जावे लागेल. यासाठी मुंबई पोलिस सक्षम आहेत. ते नक्कीच या प्रकरणाचा छडा लावतील. बिहारमध्ये विधानसभा निवडणूक लवकरच होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा पेटवला जातो आहे.
पवार यांनी याआधीच एक सविस्तर फेसबूक पोस्ट करत सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणावर आपली भूमिका मांडली होती.  पवार म्हणाले होते, “अभिनेता सुशांतसिंहच्या बाबतीत घडलेली ही घटना सर्वांनाच चक्रावणारी व मनाला चुटपूट लावणारी आहे. या घटनेला आता दीड महिना झाला आहे. सुरुवातीला मुंबई पोलिस आणि चित्रपटसृष्टीपुरते मर्यादित असलेले हे प्रकरण आता हळूहळू राजकीय रंग घेते, की काय अशी शंका येऊ लागली आहे. सुशांत गुणी अभिनेता होता का? तर निश्चितच होता. त्याची आत्महत्या आपल्या सर्वांसाठीच क्लेशदायक आहे. त्यामुळे या घटनेत कुणी दोषी असेल तर त्याचा निष्पक्षपणे तपास व्हायलाच हवा.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button