मराठी

कोविडनंतर बाजारपेठांना शेतकरी आंदोलनाचा फटका

लुधियाना/दि.३ – कोविडनंतर आता शेतकरी आंदोलनाचा फटका शहरांच्या बाजारपेठांना बसला आहे. लुधियानाच्या घाऊक बाजारात ग्राहकांची गर्दी कमी झाली आहे. ग्रामीण भागातील खरेदीदारांची कमतरता आहे. सामान्य दिवसांपेक्षा केवळ 30 ते 40 टक्के लोक बाजारात येत आहेत. विक्रीत 40 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. यामुळे व्यापारी संघटनांनी शेतक-यांच्या आंदोलनात त्वरित तोडगा काढण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
कोविड आणि टाळेबंदीमुळे पंजाबमध्ये यापूर्वीच 60 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे व्यापा-यांचे म्हणणे आहे. त्याच वेळी, हेजिंगसह अन्य व्यवसायासाठी दिल्लीसह इतर राज्यांतून शेतकरी येत नाहीत. आजकाल ग्रामीण भागातून फारशी खरेदी झालेली नाही. त्यामुळे पंजाबमधील व्यापारी वर्गाला मोठा त्रास होत आहे. गेल्या एक महिन्यापासून बाजारात रोख रकमेचा अभाव आहे आणि देयकेही वेळेवर मिळत नाहीत. लुधियानाच्या बाजारपेठेत पंजाबच्या वेगवेगळ्या भागांतून व्यापारी घाऊक खरेदीसाठी येतात. यामध्ये हेजिंग, करी, केमिकल, सायकल, मशिनरी, शिवणकाम यंत्रे, केटरिंग ही उत्पादने प्रमुख आहेत. यासाठी घास मार्केट, साबण बाजार, लक्कर बाजार, केसरगंज मार्केट, चौरा बाजार, दाल बाजार, घुमार मंडी, जवाहर नगर कॅम्प, गुडमंडी, अकाल मार्केट, गांधी नगर, सराफा बाजार, फील्डगंज यासह अनेक प्रमुख बाजारपेठा आहेत. या बाजारपेठांत या दिवसांत ग्राहकांची आवक कमी झाली आहे.
पंजाब प्रधान व्यापारी मंडळाचे सरचिटणीस सुनील मेहरा म्हणाले, की सध्या बाजारपेठेची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे कोविड तसेच शेतकरी आंदोलनाचा परिणाम हे आहे. खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातून येणारे व्यापारी खूपच कमी झाले आहेत. उलाढालीत 40 टक्के घट झाली आहे. सरकारने याबाबत तातडीने पावले उचलली पाहिजेत.

 

Related Articles

Back to top button