मराठी

शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास सरकार तयार: अमित शहा

नवी दिल्ली २८ : कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांची प्रत्येक समस्या आणि आणि मागण्यांवर विचार करण्यासाठी केंद्र सरकार तयार असल्याचे शहा म्हणाले. कृषीमंत्री नरेंद्र तोमर) यांनी शेतकऱ्यांना ३ डिसेंबर या दिवशी शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावले आहे.
पंजाबच्या सीमेपासून ते दिल्ली-हरयाणा सीमेवर महामार्गांवर विविझ शेतकऱ्यांच्या संघटनांनी केलेल्या आवाहनावर आज जे शेतकरी बांधव आपले आंदोलन करत आहेत, त्या सर्वांना मी सांगू इच्छितो की भारत सरकार आपल्याशी चर्चा करण्यास तयार आहे, असे अमित शहा म्हणाले. जर शेतकरी ३ डिसेंबरच्या पूर्वी चर्चा करून इच्छित असतील, तरी देखील सरकार तयार असल्याचे शहा म्हणाले.

Related Articles

Back to top button