मराठी

योग्यवेळी राज्यातील मंदिरे व सर्व धर्मस्थळे उघडण्याचा निर्णय घेतला जाईल

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली माहिती 

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली माहिती

  • महाविकास आघाडी सरकारला जनभावना समजते

मुंबई/दि. १३ – महाविकास आघाडी सरकारला जनभावना समजते त्यामुळे लवकरच व योग्यवेळी राज्यातील मंदिरे व सर्व धर्मस्थळेउघडण्याचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती  महेश तपासे यांनी दिली.
भाजपा मंदीराच्याबाबतीत राजकारण करत आहे. आंदोलने जरुर करा परंतु कुठल्या प्रश्नावर आंदोलने केली पाहिजे याचं भान भाजपाच्या नेत्यांना राहिलेले नाही असा टोला महेश तपासे यांनी लगावला आहे.
मंदीर प्रवेश किंवा देवदर्शन हा एक भावनिक मुद्दा आहे. यावर राजकारण करण्याऐवजी भाजपाच्या नेत्यांनी लोकांची उपजीविका कशी सुधारेल, लोकांना, तरुणांना रोजगार कसा मिळेल यावर काम करावे आणि केंद्रसरकारकडे राज्याचा असलेला जीएसटीचा परतावा परत कसा मिळेल यासाठीही आंदोलन करण्याचे धाडस दाखवावे असे आव्हान महेश तपासे यांनी भाजपच्या नेत्यांना दिले आहे.
जनतेच्या जनभावनेचा आदर करणारे महाविकास आघाडी सरकार आहे. त्यामुळे मंदीरेच नव्हे तर सर्व धार्मिक स्थळे उघडली जातील यात शंका नाही असेही महेश तपासे यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button