मराठी

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते की भाजपचे बिहार निवडणुक

 प्रभारी ; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा खोचक सवाल...

मुंबई दि. ९– सप्टेंबर – महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते बोलत आहेत की भाजपचे बिहार निवडणुक प्रभारी हे महाराष्ट्रातील जनतेला कळायला हवं ? असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.
महाराष्ट्रातील विषयावर देवेंद्र फडणवीस यांनी हिंदीतून टीका केली आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टवीट करुन ‘विषय महाराष्ट्राचा प्रतिक्रिया हिंदीत ? असा प्रश्न उपस्थित केला आहे आणि हे राज्यातील जनतेला कळायला हवे असे स्पष्ट करत देवेंद्र फडणवीस यांच्या हिंदीतील वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.

Related Articles

Back to top button