मराठी

भारत-चीनकडून निर्माण केला जातोय सीमावाद

सीमेवर केला जातोय तणाव

नवीदिल्ली/दि. १२ – भारताच्या उत्तर आणि पूर्व सीमेवर तणाव कायम आहे. चीन आणि पाकिस्तानकडून अशी स्थिती निर्माण केली जात आहे. सीमावाद एका मोहिमेतंर्गत निर्माण केला जात आहे, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ qसह यांनी दिली. या दोन्ही देशांकडून असलेल्या धोक्यांकडे त्यांनी लक्ष वेधले. राजनाथ qसह यांनी लडाख, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि जम्मू-काश्मीरच्या सीमा भागात उभारण्यात आलेल्या ४४ पुलांचे ऑनलाइन उद्घाटन केले. अधिकाèयांकडून मिळालेल्या माहितीनुसार या ४४ पुलांपैकी लडाखमधील सात पुलांसह बहुतांश पूल हे रणनीतीच्यादृष्टीने महत्वपूर्ण भागात आहेत. ज्यांची आपल्या सैन्याला शस्त्रांची वाहतूक करण्यासाठी मदत होणार आहे. हे पूल बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन(BRO) कडून उभारण्यात आले आहेत. आपल्या उत्तर आणि पूर्व सीमेवर जी परिस्थिती निर्माण केली, त्याची तुम्हाला कल्पना असेल. आधी पाकिस्तान आणि आता चीन. एका मिशनतंर्गत सीमावाद निर्माण केला जातो आहे. या दोन्ही देशांसोबत आपली सात हजार किलोमीटरची सीमारेषा आहे. तिथे नेहमीच तणाव असतो, असे सांगून राजनाथ qसह म्हणाले, की चीनला लागून असलेल्या पूर्व लडाख सीमेवर सध्या प्रचंड तणावाची स्थिती आहे. पाकिस्तानबरोबर नेहमीच संघर्ष सुरू असतो. काही दिवसांपूर्वी एअर फोर्स प्रमुखांनी हवाई दल एकाचवेळी दोन आघाड्यांवर लढण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटले होते.

Related Articles

Back to top button