मराठी

नदीच्या पुरामुळे 15 हेक्टरचे जंगल नष्ट

डेहराडून/दि.९ – उत्तराखंडच्या चमोलीत हिमस्खलनामुळे आलेल्या आपत्तीनंतरचे चित्र अतिशय भयंकर होते. ऋषिगंगा नदीच्या किनारी 15 हेक्टरचे मरिंडा जंगल काही मिनिटांत साफ झाले. ऋषिगंगा व तपोवन वीज प्रकल्पाशिवाय चीन सीमेपर्यंत पोहोचलेला बीआरओपूल, तीन ते चार पूल, अनेक मंदिरे आणि घरेकेवळ अर्ध्या तासांत उद्ध्वस्त झाले. चमोलीच्या रेनी गावात हेसंकट कोसळले. हा भाग नीती खोर्‍यात येतो. चीन सीमेजवळ हा भाग येतो. डेहराडून येथील वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिओलॉजीच्या संशोधकांनी आपत्तीबाबत काही शंका व्यक्त केल्या. त्या धक्कादायक आहेत. ही गोष्ट केवळ पुरापुरती मर्यादित नाही. त्यामागे हिमस्खलनानेआपत्तीच्या रौद्र रूपाला आणखी विक्राळ बनवले.
वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. एस.के. राय म्हणाले, की ज्या भागात आपत्ती आली तेथे काही दिवसांपूर्वी प्रचंड हिमवृष्टी झाली होती. शिखर भागात बर्फमोठ्या प्रमाणात साठला होता. त्यातून तापमानात घट झाल्यानेहिमनदी जास्त गोठली. सोबतच बर्फातील ठिसूळपणाही वाढतच राहिला. बहुधा पृष्ठभागावरील बर्फव ढिगार्‍यासोबत लोट खालच्या दिशेने घसरले. आमची एक टीम त्याचा सखोल अभ्यास करत आहे. त्याचेनिष्कर्षलवकरच जाहीर केले जातील. ताज्या अभ्यासानुसार हवामानातील बदलामुळे गंगोत्री हिमनदी दरवर्षी 22 मीटर मागे घसरत चालली आहे. उत्तराखंडमधील हिमनद्या शिखराकडे जास्त उंचीवर असल्यानेधोकादायक ठरतात, असेमानलेजाते.
केंद्राचे संचालक प्रो. एमपीएस बिष्ट म्हणालेकी, ऋषिगंगा कॅचमेंट भागात 2013 मध्येकेदारनाथ येथे आलेला प्रलय बिलकुल वेगळा होता. दुर्घटनेमागेहिमस्खलन किंवा बर्फाच्या लोटांची घसरण हेकारण नाही. उत्तराखंड अंतराळसंबंधी केंद्राने गेल्या दिवसांतील मॅपिंगचा आढावा घेतला. त्यात असेकोणतेही संकेत मिळालेले नाहीत. आता हिमनदीचेहिमस्खलन, नदीचा प्रवाह गोठणेयामागेबर्फाचेशिखर कोसळणेयास आपत्तीच्या सुरुवातीचेकारण मानलेजात आहे. केद्र दुर्घटनेपासून सातत्याने डेटा मॅपिंग करत आहे. या भागात भूस्खलनाची अनेक केंद्रे आहेत.
हिमालयाच्या मोठ्या क्षेत्राचा भाग देवभूमी उत्तराखंडमध्येआहे. हिमनद्यांची एक नैसर्गिक व्यवस्था आहे. त्यातच 2013 ची केदारनाथ व आता बद्रीनाथजवळील चमोलीच्या आपत्तीचे रहस्य लपलेले आहे. पर्वतांवरील हिमनद्या व त्यातून उगम होणार्‍या नद्यांचे प्रवाह तसेअतिशय शांत आहेत. स्थान बदलल्यानंतर नाव बदलले जातेआणि मार्ग रोखल्यानंतर रौद्ररूप धारण केले जाते, असे नद्याचे स्वरूप म्हणता येईल. देवभूमीच्या या नद्यांतून पर्वतात पाच प्रयाग तयार होतात. कुमायूंच्या दोन प्रमुख भागांत उत्तराखंडच्या गढवाल भागात मोठी हिमनदी आहे. दुर्घटनेनंतर बेपत्ता लोकांचे नातेवाईक घटनास्थळी येऊ लागलेआहेत. अश्रूंनी डबडबलेलेडोळे एखादा चमत्कार होईल, याची प्रतीक्षा करताना भटकूलागले आहेत. हरिद्वारहून आलेले संदीप एका दुसर्‍या अधिकार्‍याकडेजाऊन विकी नावाच्या भावाबद्दल चौकशी करू लागलेआहेत; परंतु कुणाकडेही काहीच उत्तर नाही. अधिकारी ढिगार्‍याकडेपाहत प्रतीक्षा करण्याचा सल्ला देत आहेत. हरिद्वारच्या एका इलेक्ट्रिक कंपनीकडून ऋषिगंगा वीज प्रकल्पात कार्यरत होता. त्याच्यासोबत इतर तीन कामगारही होते. संदीप म्हणाले, की दुर्घटनेत प्राण वाचलेल्या मित्राने भावाबद्दलची माहिती दिली. दुर्घटना घडली, तेव्हा विकी प्रकल्पाच्या गेटपर्यंत पोहोचला होता; परंतु नंतर त्याचा काही शोध लागला नाही. हरेंद्र कंडियाल यांची कहाणीदेखील अशीच आहे. ते नंदप्रयाग घाटावरील रहिवासी आहेत. त्यांच्यासोबत आलेले भक्तप्रसाद यांचे चुलत भाऊदेखील बेपत्ता आहेत. हे दोघेही प्रकल्पात सुरक्षा रक्षक म्हणून तैनात होते. दुर्घटनेनंतर स्थानिक लोकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. कडाक्याच्या थंडीतही आता लोकांना घरात जाण्याची इच्छा होत नाही. घटनेनंतर घरात मातीच माती वाहून आली आहे. भिंतींनाही तडे गेले आहेत, असे एका महिलेने सांगितले. घटनेवेळी बसलेल्या हादर्‍यांमुळे लोकांची अजूनही झोप उडाली आहे.

Related Articles

Back to top button