मराठी

ठाकरे सरकारच्या त्रासामुळे एसटी कंडक्टरची आत्महत्या

जळगाव/दि.९  – कोरोनाच्या काळापासून एसटी मंडळाच्या कर्मचार्‍यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पगार मिळत नसल्याने ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर एसटी कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशात एका एसटी महामंडळाच्या कंडक्टरने आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे. ’माझ्या आत्महत्येला एसटी महामंडळातील कार्यपद्धती आणि ठाकरे सरकार जबाबदार असल्याची सुसाईट नोट लिहून जळगावातील एका कंडक्टरने आपले जीवन संपवले.
जळगाव जिल्ह्यातील रायपूर कुसुम्बा गावातील रहिवासी असलेले आणि एसटी मंडळात कंडक्टर असलेल्या मनोज चौधरी यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चौधरी यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाईट नोट लिहून ठेवली. ”एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. यास जबाबदार एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसाचे ठाकरे सरकार आहे. माझ्या घरच्यांचा यात काहीही संबंध नाही. संघटनांनी माझ्या पीएफ आणि एलआयसी विमा हा माझ्या कुटुंबाला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, असा मजकूर चौधरी यांनी चिठ्ठीत लिहिला आहे.
एसटी मंडळामध्ये गेले तीन-चार महिने पगार मिळत नसल्याने मनोज कर्जबाजारी झाला. त्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याची माहिती मनोज चौधरीच्या वडिलांनी दिली आहे. रत्नागिरी एसटी महामंडळाच्या बस आगारात एका बस कंडक्टरने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पांडुरंग संभाजीराव गडदे असे या बस वाहकाचे नाव आहे.
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केल्यानंतर आता भाजपने चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात एसटी कर्मचार्‍यांचा तीन महिन्यांचा पगार थकीत आहे. त्यामुळे जळगावातील एका एसटी कर्मचार्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. एसटी कर्मचार्‍याच्या या आत्महत्येला कोण जबाबदार? सरकार आता कुणाला तुरुंगात टाकणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की परिवहन मंत्री अनिल परब यांना? असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला आहे.

Related Articles

Back to top button