मराठी

ठाकरे सरकारची वाढणार डोकेदुखी

मराठा आरक्षणावर निर्णय घ्या, नाही तर पडू नाही देणार घराबाहेर

औरंगाबाद/दि.८–  मराठा समाजाच्या न्याय्य हक्काच्या आंदोलनाची मोठी तयारी औरंगाबाद येथे सुरू आहे.  त्यामुळे राज्यात सत्तेवर आलेल्या उद्धव ठाकरे सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.शहरातील महत्वाच्या क्रांती चौक येथून या आंदोलनाला शनिवारी सकाळीच सुरूवात झाली. आंदोलनात आत्महत्या केलेल्या मराठा बांधवांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक रमेश केरे पाटील यांनी घेतली आहे.
9 ऑगस्ट रोजी क्रांती दिन आहे. क्रांती दिनापर्यंत मराठा आरक्षणाबाबत निर्णय झाला नाही तर सरकारच्या एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलनााला बसू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बाहेर पडू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी यापूर्वी दिला होता.  मराठा समाजाचा केवळ राजकारणासाठी करू नका. आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करणाऱ्या तरुणांच्या कुटुंबीयांना नोकरीच्या आश्वासनाची सरकारने अंमलबजावणी करायला हवी.
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button