मराठी

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे व्यक्तित्व व कार्य दीर्घकाळपर्यंत स्मरणात राहील

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून शोक व्यक्त

अमरावती, दि. 31 : माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी हे देशाचे अग्रणी नेते, संवेदनशील व्यक्ती होते. त्यांचे व्यक्तित्व व कार्य दिर्घकाळापर्यंत देशाच्या स्मरणात राहील, अशा शब्दांत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी माजी राष्ट्रपती दिवंगत मुखर्जी यांना आदरांजली वाहिली.
माजी राष्ट्रपती मुखर्जी यांच्या निधनाबद्दल पालकमंत्री श्रीमती यांनी शोक व्यक्त केला. दिवंगत मुखर्जी हे संवेदनशील व्यक्ती होते. त्यांचे सर्वांशी स्नेहाचे संबंध होते. भारतीय राजकीय मूल्यांची जपणूक त्यांनी आयुष्यभर केली. वंचित घटकांबाबत त्यांना विशेष आस्था होती. ते एक कृतीशील नेता व कुशल मार्गदर्शक होते. त्यांच्या जाण्याने नैतिक राजकीय मूल्यांची पाठराखण करणारा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला आहे, अशा शब्दात पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Related Articles

Back to top button