मराठी

उसाच्या लाल रोगावर आता सेंद्रिय कीटकनाशक

लखनऊ दि २४ – लाल रोगामुळे ऊस उत्पादनात दहा ते पन्नास टक्के घट होते. कष्ट करूनही शेतक-यांना तितकासा फायदा मिळत नाही. रासायनिक कीटकनाशकांचा वापर रोग बरे करण्यास उपयोगी ठरू शकतो; परंतु ऊस आणि मातीवर याचा प्रतिकूल परिणाम होतो. त्यावर आता मात करणे शक्य आहे. सेंद्रिय कीटकनाशकाचा शोध लागला असून त्यामुळे नुकसान टळण्याबरोबरच वीस टक्के उत्पादन वाढ होणार आहे.
बाबासाहेब भीमराव आंबेडकर मध्यवर्ती विद्यापीठाचे संशोधक डॉ.बिनू शास्त्री यांनी या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी उसामध्ये असे सूक्ष्म घटक शोधून काढले आहेत, जे ऊस उत्पादन तसेच रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रभावी आहेत. उसावर वर्षभर प्रयोग केल्यानंतर अर्थपूर्ण निकाल समोर आले आहेत. आता हा सूक्ष्म घटक पुढील महिन्यात मऊ येथे असलेल्या राष्ट्रीय कृषी उपयुक्त मायक्रोब ब्यूरोकडे पाठविला जाईल. तेथे सामान्य शेतक-यांसाठी तंत्रज्ञान विकसित केले जाईल आणि शेतकरी त्याचा लाभ घेऊ शकतात. डॉ. बिनु शास्त्री म्हणाले, की सेंद्रिय शेतीबाबत चर्चा होत असतानाही कोणीही सेंद्रिय कीटकनाशकाविषयी बोलत नाही. जर सेंद्रिय ऊसामध्येही लाल रोगाचा प्रभाव असेल तर त्यासाठी रासायनिक कीटकनाशक वापर केला जातो. त्याचा उसाच्या उत्पादनात साखर किंवा गूळावर विपरीत परिणाम होतो.
संशोधकांना असे आढळले आहे, की, ऊस, अंडोफायटीक बॅक्टेरियाच्या स्टेम आणि मुळांमध्ये आढळलेल्या सूक्ष्मजीवांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता जास्त असते. त्यामुळे रोगाचा थेट इलाज करण्यासाठी वैज्ञानिक मार्गाने काढले जाते. संशोधनाचा प्रयत्न यशस्वी झाला आणि विद्यापीठाच्या आवारातच ऊस लागवड तयार करून त्याची चाचणी घेण्यात आली. हा काढलेला घटक मौ येथील राष्ट्रीय कृषी उपयुक्त मायक्रोब ब्यूरोला पाठविला जाईल. तेथून शेतकरी त्याचा कसा उपयोग करू शकतील याबाबत माहिती दिली जाईल. सेंद्रिय कीटकनाशकामुळे नुकसान टळणार आहे. शिवाय उत्पादनात वीस टक्के वाढ होणार आहे.

Related Articles

Back to top button