मराठी

“विकेल ते पिकेल” या धोरणावर मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी संवाद साधणार

यवतमाळ, दि. 8-  मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे हे विविध कृषि विषयक योजनांच्या संदर्भात दिनांक  10 सप्टेंबर 2020 रोजी दु. 12 ते 1.30 वा. शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषी मंत्री दादाजी भुसे, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, कृषी सचिव एकनाथ डवले, पोकराचे प्रकल्प संचालक रस्तोगी, कृषी आयुक्त धीरज कुमार उपस्थित राहणार आहेत. राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी, महिला व नागरिकांनी  या कार्यक्रमात सहभागी व्हावे अशी विनंती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केली आहे.कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाचे क्षेत्रिय कर्मचारी ग्रामपातळीवर स्थानिकांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत. सदर कार्यक्रमाचे कृषी विभागाच्या यु-ट्युब चॅनेल (http://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM) वर लाईव्ह प्रसारण करण्यात येईल.
“विकेल ते पिकेल” अंतर्गत मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिर्वतन अभियानाची (SMART) सुरुवात करण्यात येईल. या प्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे ग्रामपातळीवरील कृषी विकास कार्यक्रमाची रुपरेषा मांडून  “चिंतामुक्त”  शेतकरी  व “शेतकरी केंद्रित” कृषी विकास यावर आपले विचार मांडतील व शेतकऱ्यांशी संवाद साधतील.

Related Articles

Back to top button